यापुढे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपादासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. यापुढे सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षाची निवड केली जाईल. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक न घेण्याबाबत घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीला घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, आगाणी म्हणजेच ९२ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. या दोन स्थळापैकी एका ठिकाणी यंदाचे साहित्य संमेलन होणार आहे.

[amazon_link asins=’8173711461′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca672d90-7d38-11e8-8c43-2573aa6dd691′]

गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद असे समिकरण बनले होते. नागपूर मधील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे हे समिकरण दूर होण्यास मदत होणार आहे. निवडणूकीच्या वादामुळे अनेक प्रतिभावान साहित्यिक केवळ निवडणूकीच्या प्रक्रियेमुळे संमेलनाध्यक्षपदापासून दूर राहिले. आजच्या निर्णयामुळे अनेक प्रतिभावान साहित्यिकांना संमेलनाध्यक्षपद भूषवता येईल.