‘बँक खाते’ आणि ‘मोबाईल कनेक्शन’ साठी आधार कार्डची गरज नाही, मंत्रिमंडळाची ‘संशोधन’ विधेयकास मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक खाते उघडण्यासाठी तसेच मोबाईल फोनचे कनेक्शन घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. यासंबंधीच्या संशोधन विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार, जर कोणत्या कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख स्पष्ट करण्यासाठी आधारची सक्ती केली जाणार नाही.
अधिकच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ‘आधार तसेच अन्य कायदा विधेयक २०१९’ ला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाला पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या अधिवेशनात सादर केले जाईल. या निर्णयामुळे यूआयडीएआय लोकांच्या हितासाठी मजबूत प्रणाली तयार करण्यासाठी सक्षम होईल. यांमुळे आधारचा गैरवापर कमी होण्यास मदत होईल.
या संशोधनानंतर, जर संसदेकडून पास झालेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख स्पष्ट करण्यासाठी आधारची सक्ती केली जाणार नाही. या विधेयकात आधारचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींसाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
उल्लेखनीय आहे की, २८ फेब्रुवारी २०१९ ला मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अन्य कायदा अध्यादेश, २०१९ यावर विचार करण्यात आला होता आणि राष्ट्रपतींनी २ मार्च २०१९ ला अध्यादेशाची घोषणा केली होती.
आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)
‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी
पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा
विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य
स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!