‘त्यांच्या’ उमेदवारांना तालुक्यात कुणी ओळखत नाही : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे प्रचारक आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी वंचित बहुजन आघाडीवर शाब्दीक स्ट्राईक केला आहे. वंचित बहुजन आघाडीची वाटचाल भाजपाला मत करणारी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे चारसुद्ध खासदार निवडणून येणार नाहीत. त्यांच्या उमेदवारांना तालुक्यात कुणी ओळखत नाही असे मुंडेंनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसेल असा वाटत नाही. वंचित आघाडी दोन ते तीन टक्क्यांपेक्षा अधिक मत घेणार नाही असे सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. आम्ही त्यांना घाडीत घेण्यास इच्छूक होतो. त्यांना ४ जागांवरुन २ ते ३ जागा वाढविण्यासही तयार होतो. मात्र, त्यांनी चर्चा करण्यास नकार दिला. यावरुन भाजपला मदत करण्यासाठीच वंचित आघाडीचा प्रयत्न असल्याच मुंडेंनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वागण्यातून जे दिसतंय, ते कुठेतरी भाजपाला मदत करण्यात येत असल्याचं स्पष्ट होतंय. २३ मे रोजी जेव्हा निकाल लागेल, तेव्हा तुम्हाला वंचित आघाडीबद्दल दिसेल. वंचित आघाडीचे ४ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. वंचित आघाडीच राजकारणं हे संघ आणि भाजपाला मदत करण्यासाठी असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलंय, असेही धनंजय मुंडे त्यांनी सांगितल.