आता गाव-खेड्यातील सर्व अतिक्रमणं नियमित होणार

उस्मानाबाद : पोलीसनामा आॅनलाईन
बातमी आहे ग्रामिण भागातील नागरिकांच्या भल्याची, कारण आता ग्रामिण भागातील सरकारी जागेवरील सर्व अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वीची सर्व बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत.
[amazon_link asins=’B01MUUPL3Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’018c8516-a60a-11e8-b7f3-cfba18f07721′]
यामध्ये गायरान, गावठाणे, सरकारी उकिरडे, खळवाढीच्या सरकारी जागावरची सर्व बांधकामं यांचा समावेश असणार आहे. यामुळे आता मागासवर्गीय वस्त्या नियमित होतील तसेच अल्प पैसे भरुन सर्व बांधकाम नियमित करता येणार आहेत.
बहुचर्चीत अशा अादर्श प्रकरणानंतर 2013 साली सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या नियमात विद्यमान सरकारने बदल केला असून, 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटीशांनी खळे करण्यासाठी, जनावरे उभी करण्यासाठी, चराईसाठी, वाढच्या वस्तीसाठी गावठाणाच्या जमिनी निश्चित केल्या होत्या. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.