पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जातिव्यवस्थेविरोधात उभं राहणं ही काळाची गरज असून समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला यापुढे अडीच लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली.
सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.