धक्‍कादायक ! मुख्याध्यापकाचं शाळकरी मुलीसोबत ‘अश्‍लील’ वर्तन, परिसरात खळबळ

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील एका गावातील सरकारी शाळेत मुख्याध्यापकानेच मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या असहायतेचा फायदा घेत हा मुख्याध्यापक त्या मुलींशी लगट करून त्यांचा विनयभंग करत असे. बाजीराव गणपती पाटील असे या नराधम मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी त्याला या प्रकरणी अटक केली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या शाळेतील सहावी आणि सातवीतल्या मुलींनी धाडस करून त्याच्या या गैरकृत्यांचा पाढा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे वाचला असता त्याची तक्रार दाखल करण्यात आली. या मुलींनी सुरुवातीला आपल्या पालकांना या प्रकाराविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या संबंधीची तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शिक्षक या मुलींचा गैरफायदा घेत त्यांच्याशी गैरवर्तन करत असे. त्याचबरोबर या मुलींनी विरोध केला असता त्यांना त्रास देण्याचे काम देखील करत असे.

त्रास दिलेल्या मुलींनी या प्रकरणाची अन्य शिक्षकांकडे तक्रार करून देखील त्याचे हे कारनामे थांबत नव्हते. शेवटी कंटाळून या मुलींनी आपल्या पालकांना याविषयी सांगितले. १७ जून ते २४ जुलै या महिनाभराच्या कालखंडात त्याने हे गैरवर्तन केल्याचे मुलींनी सांगितले. त्यानंतर करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांनी स्वतः या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात या मुख्यध्यापकाची तक्रार नोंदवली. त्याला अटक करण्यात आली असून ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण गावात बातमी पसरल्यानंतर संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –