दक्षिण आशियात ‘कोरोना’ व्हायरसची 6000 प्रकरणं, अधिकारी म्हणाले – ‘भारतात वाढू शकतो लॉकडाऊनचा कालावधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दक्षिण आशियातील कोरोनाव्हायरसच्या नवीन रुग्णांची संख्या जवळपास ६,००० च्या जवळपास पोहोचली. काही शहरांमध्ये अधिकाऱ्यांनी लॉकडाउन निर्बंध कडक केले आणि सांगितले की, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी त्याचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “जर लोक नियमांचे गांभीर्याने पालन करत नसतील आणि प्रकरणे वाढतच राहिली तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.’ मुंबई आणि महाराष्ट्रातील शहरी भागात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या आठवड्यात टप्प्याटप्प्याने तीन आठवड्यांच्या लॉकडाउनमधून देश बाहेर पडेल. दक्षिण आशियामध्ये २,९०२ प्रकरणांमध्ये भारताला सर्वात जास्त कोरोना पीडित आहे त्यापैकी ६८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसच्या ५३७ प्रकरणांची महाराष्ट्रात पुष्टी झाली आहे तर २६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सरकार १४ एप्रिल रोजी संपणाऱ्या लॉकडाऊनचा आढावा घेण्याच्या विचारात आहे. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते प्रत्येक राज्यातील परिस्थितीच्या आकलनावर अवलंबून असेल आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनोव्हायरसचा प्रभाव कायम राहील अशा ठिकाणी लॉकडाउनला मंजुरी देण्यात येईल.

दक्षिण आशियामध्ये दुप्पट आहेत कोविड -१९ प्रकरणे
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाऊन संपल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या मोठ्या महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक टप्प्याटप्प्याने पुनर्संचयित केली जाऊ शकते.

गेल्या आठवड्यात दक्षिण आशियामध्ये कोविड -१९ च्या घटना दुप्पट झाल्या असून आरोग्य तज्ञांनी जगाच्या लोकसंख्येच्या पाचव्या भागात असलेल्या या प्रदेशात साथीच्या रोगाचा इशारा दिला आहे. हे कमकुवत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर अधिक परिणाम करू शकते.

दक्षिण आशियातील कोरोना व्हायरसची आकडेवारी
भारतात २,९०२ प्रकरणे, ६८ मृत्यू
पाकिस्तानमध्ये २,५४७ प्रकरणे, ३७ मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये ६ मृत्यू, २८१ प्रकरणे
श्रीलंकेत १५९ प्रकरणे, ५ मृत्यू
बांग्लादेशमध्ये ६ मृत्यू, ६१ प्रकरणे
मालदीवमध्ये ३२ प्रकरणे, एकही मृत्यू नाही
नेपाळमध्ये ६ प्रकरणे, एकही मृत्यू नाही
भूतानमध्ये ५ प्रकरणे, एकही मृत्यू नाही