तुमच्याशिवाय सरकारचं अडेल या भ्रमातून बाहेर पडा, ज्येष्ठ नेत्यांना शिवसेनेकडून ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुनावले आहे. सामनातून अग्रलेख लिहित सांगण्यात आले की शिवसेनेला जुने जाणते आणि नवे तडफदार मोहरे निवडावे लागतील, राज्यातील राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत अशी अपेक्षा आहे. मुरलेला मुरंबा आणि लोणची जेवणात बरी, म्हातारे नवरेही गमतीलाच बरे, अशी लोकभावना आहे, परंतू तरीही जुने नेते तरुणांसाठी खुर्च्या सोडायला तयार नाहीत. आपण नसलो तर महाराष्ट्राचे आणि सरकारचे अडेल या भ्रमात महामंडळींनी बाहेर पडायला पाहिजे.

अग्रलेखात म्हटले आहे की तसेच मित्र पक्षांनी मलाईदार किंवा वजनदार खात्यांचा आग्रह सोडावा. मलईदार समजल्या जाणाऱ्या खात्यातून जनतेची सेवा करता येते असे ज्यांना वाटते त्यांची नियत साफ नाही. मदत व पुनर्वसन, आयटी, कौशल्य विकास, शालेय शिक्षण आणि आरोग्य अशा खात्यांना हात लावायला कुणी तयार नाही. ही काय खाती आहेत का, असा प्रश्न विचारला जातो. मराठी भाषा, सांस्कृतिक खात्यातही कुणी रमायला तयार नाही. गृह, नगरविकास, बांधकाम आणि पाटबंधाऱ्यावर जीवनाचे सार आहे, असे वाटत असेल तर लोकसेवा आणि राज्याचे हित या शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल.

शिवसेनेने अशी भूमिका घेतली तर मंत्रिमंडळात नवे चेहरे पाहायला मिळतील,परंतू त्यासाठी पक्षातील कोणत्याही ज्येष्ठांना डच्चू दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष असेल. आज नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना याबद्दल प्रश्न विचारु शकतात. परंतू फडणवीस म्हणाले की आम्ही यात सहभागी होणार आहोत, परंतू हे विषय कोणापुढे मांडायचे, आमच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार ?

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/