सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन खूनात झाल्याचे खळबळजनक घटना साताऱ्यात घडली आहे. येथील माची पेठेतील शंकराचार्य मठाजवळ धनंजय दगडू खोत (५०) याने पत्नी वैशाली यांचा नारळ सोलण्याची लोखंडी पहार डोक्यात मारून खून केला. खुनानंतर धनंजय खोत याने रिक्षासह पळ काढला. त्याची रिक्षा चारभिंती परिसरात पोलिसांना सापडली तसेच रिक्षामध्ये रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी रिक्षा जप्त केली असून धनंजय खोतवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5118fc30-d1f3-11e8-a80a-7d5594e4b52a’]
मुंबई विद्यापीठाचा गजब कारभार गेल्या वर्षी 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं !
घाबरलेल्या सृष्टीने आरडोओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. काही नागरिकांनी घटनेची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यास कळवली. माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पोरे हे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. वैशाली यांच्या डोक्यास पाठीमागील बाजूस गंभीर मार लागला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेली नारळ सोलण्याची छोटी लोखंडी पहार सापडली. त्याच पहारीने डोक्यात वार करुन वैशाली यांचा खून केला. चौकशीत धनंजय खोत हा दुपारी घाईगडबडीत रिक्षा घेवून पसार झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी धनंजयचा शोध घेतला असता त्याची रिक्षा पोलिसांना चारभितींजवळ सापडली. या रिक्षात रक्ताचे डाग पडले होते. पोलिसांनी ती रिक्षा ताब्यात घेत अजिंक्यतारा किल्ला परिसर पिंजून काढत पळालेल्या धनंजयचा शोध सुरु केला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’237bf5dd-d1f1-11e8-a93c-6b917c7565cd’]
जाहीरात