नाना – दत्ता वादावर बोलण्यास दिग्गज कलावंतांची टाळाटाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

चित्रपट श्रुष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता ने गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे, हा वाद इतका वाढला आहे की,या रंगलेल्या वादावर प्रतिक्रिया देन्यास कोणताही कलाकार तयार होत नाहीये. या वाद विषयी बोलण्यास सर्व कलावंत टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2e17f2c-c2e0-11e8-8c3a-476a0213c9a3′]

याबाबत अधिक माहिती अशी की, एका मुलाखतीत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान हा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले. इतकेच नव्हे तर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले होते हे अनेकांनी पाहिले परंतु कोणीही माझ्यामागे उभे राहिले नाही, सगळ्यांनी यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही तनुश्री सांगितले.

सोलापूर : चालकाविना अर्धा किलोमीटर धावला ट्रक

विशेष म्हणजे सध्या इंडस्ट्रीमध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या वादावर बोलण्यास सर्वच कलावंतांन साबोत दिग्गज कलावंतही बोल्याणास टाळाटाळ करत आहेत. तसेच बुधवारी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या या वादा विषयी विचारले असता शहेनशहा अमिताभ बच्चन यांना विचारले असता, ‘माझे नाव तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, मग मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसे देऊ शकतो?,’ अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी देऊन त्या विषयी बोलण्यास टाळले. इतकेच नव्हे तर अभिनेता आमिर खाणनेही ‘मला या संपूर्ण प्रकरणाची सत्यता माहीत नाही. त्यामुळे यावर विषयावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. पण अशा घटना घडणे अत्यंत दु:खद आहे,’ असे म्हणत या वादावर बोलणे टाळले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57fc7e78-c2e3-11e8-abe3-1d0be0c05d33′]