Latur News : ‘आम्ही जातो आमच्या गावा…आमचा राम राम घ्यावा’, पराभूत होऊनही विकास जिंकला

लातूर : राजकारणात जय-पराजय होतच असतो़ त्यामुळे खचून न जाता पुढे जायचे हे राजकाणातील हेच सूत्र पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्यां एका पठ्ठयान अंगीकारल आहे़ नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत या तरूणाला १२ मतं मिळाली पराभव झाला  पण त्याच्या मनाचा मोठेपणा पराभव झाल्यानंतरही जिंकून गेला़ विकास शिंदे अस त्याच नाव असून पराभव झाल्यानंतरही त्याने चक्क मतदारांनाचे आभार मानले आहे़ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे़ त्याच्या या कृतीमुळे हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है… शाहरुखचा हा डायलॉग नक्कीच त्याला लागू होतो.

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी गावचा विकास शिंदे सध्या अहमदपूर इथं पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे. काही काळासाठी तो पुण्यातही वास्तव्यास होता. पुढं गावात निवडणुकीचे वारे वाहत होते, अशातच आपणही गावच्या विकासात हातभार लावला पाहिजे, गावच्या राजकारणाचा भाग बनलं पाहिजे, असे वाटल्याने तो ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभारला. मात्र, गावकऱ्यांनी विकास नाकारला. केवळ १२ मतं विकासला या निवडणुकीत पडली. तरीही, हताश न होता, बारा मतदारांचे आभार विकासने मानले. डिजिटल फ्लेक्स उभारुन त्याने सर्वांचे लक्ष वधेले. त्याने डिजिटल बोर्डवर लिहिलेला मजकूर सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. त्यामुळे, त्याचा हा डिजिटल फलक सध्या व्हायरल होत आहे.

‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा ….पण तुम्ही म्हणलो पसारा भरा ….आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. समाजाने नाकरल… गावानं नाकरलं, मात्र आम्हाला देश स्वीकारणार…’ ‘सात जन्म तुमचे हे उपकार विसरणार नाही’, असं लिहलेले बॅनर गावात लावले.’तुमच्या मताचे देशात नाव करीन’, असं म्हणत आता देशात नाव करेन, असे आश्वासनच विकासने गावकऱ्यांना आणि त्या १२ मतदारांना दिलंय.

पराभवाचे हे शल्य असं लिहून बॅनरवर, आपल्याला मिळालेल्या अवघ्या १२ मतांसाठीही या पठ्ठ्यानं मतदारांचे आभार मानले आहेत. या कृतीमुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरला आहे़ लाखो नेटीझन्सची मने त्याने जिंकली आहेत. त्यामुळे, आता गावच्या कठ्ठ्यापासून ते सोशल मीडियातील वेगवेगळ्या कट्ट्यांवर त्याचीच चर्चा आहे. म्हणून, हारकर जितनेवाले को विकास कहतै है… असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.