अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या खात्यात उरले केवळ १९.३४ कोटी 

कोलकाता : वृत्तसंस्था – राफेल घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले. भारतातील उच्च ५० उद्योगपतीन मधील एक उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या १४४ बँक खात्यात केवळ १९.३४ कोटी  रुपये  शिल्लक असल्याची माहितीसमोर आली आहे.नवी दिल्ली उच्च न्यायालयात एका खटल्याप्रकरणी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या यांच्या आरकॉमवर बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने २३०  कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. दरम्यान नवी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या १४४ बँक खात्यात केवळ १९.३४ कोटी रुपये  शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अंबानींच्या या कंपनीवर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे वायरलेस बिझनेस आरकॉमने गेल्यावर्षी बंद केला. सातत्याने तोटा होत असल्यामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला होता. त्यामुळे आरकॉमला याच वर्षी बँकरप्टसी प्रोसिडिंग्जमध्ये खेचण्यात येत होते. मात्र त्यातून ही कंपनी थोडक्यात बचावली.
 रिलायन्सने त्यांच्या ११९ बँक खात्यात केवळ १७.८६ कोटी रुपये जमा असल्याचं आणि आरटीएल कंपनीने त्यांच्या २५ बँक खात्यात एकूण १.४८ कोटी रुपये जमा असल्याचे  नवी दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे नवी दिल्ली उच्च न्यायालयात दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. दरम्यान बँक स्टेटमेंट्स देण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागितला होता. याबाबत येत्या १३ डिसेंबर रोजी  नवी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.