‘… तर महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आमचे सरकार आल्यास सरसकट कर्ज माफी देण्याचे आश्वासन दिले होते. आता चालढकल केल्यास त्यांचे सरकार पाच वर्षे टिकणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इतर निर्णय ज्या वेगाने घेतले जात आहेत, त्याचप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असेही पाटील म्हणाले.

शिवसेना सत्तेत आल्यानंतर सगळ्यात आगोदर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. तसेच युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत याचा उल्लेख केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आगोदर घेतील असे वाटले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय न घेता इतर निर्णय घेतले.

देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाचवर्षे काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असे भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी वर्तवलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडचा ज्यापद्धतीने निर्णय घेतला तसा निर्णय कर्जमाफीचा घ्यावा. मात्र, उद्धव ठाकरे अभ्यास करतोय, माहिती घेतो असे सांगत राहिले तर हे सरकार टिकणार नसल्याचे पाटील म्हणाले.

Visit : policenama.com