भारतीय सैन्यांच्या कार्यवाहीला आमचा नेहमीच पाठींबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये गतिमान हालचाली घडण्यास सुरुवात झाली आहे. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना हल्ल्या बाबत माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते.

भारताच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तसेच आमचा भारतीय लष्कराच्या कार्यवाहीला नेहमीच पाठींबा राहील असे गुलामनभी आझाद यांनी सर्वपक्षीय बैठकी नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना म्हणले आहे.

भारताने आज केलेले लष्करी ऑपरेशन हे स्वच्छ आणि फक्त दहशतवादी मुख्यालयाला लक्ष करून करण्यात आले होते. त्याच प्रमाणे पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष करण्याचा भारतीय सैन्याचा उद्देश नव्हता असे गुलामनभी आझाद म्हणाले आहेत.