शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार : सदाभाऊ खोत 

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो. शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार असा टोला सदाभाऊ खोत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच जयंत पाटील यांना लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी  मनसे अध्यक्ष ठाकरे आणि जयंत पाटील यांनी कांद्याच्या दरावरुन सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देत सदाभाऊ खोत यांनी  “कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे एवढे समजण्याएवढे सरकार शहाणे आहे. शेतात काम करून आलेली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केलेली आमच्यासारखी माणसे या सरकारमध्ये काम करत आहेत.” इतकेच नव्हे तर आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो. असे त्यांनी म्हंटले. विशेष म्हणजे  शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार असा टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच जयंत पाटील यांना लगावला.

याचबरोबर “आम्हाला शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची काळजी आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय मिळेल याकडे जास्त लक्ष देतो”,

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळमध्ये ५० पैशांपासून एक रुपयापर्यंत मदत दिली गेली होती. आमच्या सरकारने किलोला दोन रुपये मदत दिली आहे. म्हणजे आघाडी सरकारपेक्षा आम्ही दुप्पट मदत केली आहे, तसेच गरज भासली तर आणखी मदत देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना मदतच दिली नव्हती त्यांना आमच्या सरकारने दिलेली मदत तोकडीच वाटणार,” असेही त्यांनी म्हंटले.