खुशखबर ! मोदी सरकारकडून फक्त 55 रुपयात 3 हजाराची पेन्शन, आतापर्यंत 32 लाखाहून अधिक जणांना फायदा, जाणून घ्या
नवी मुंबई : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या पंतप्रधान श्रम योगी मानधन पेंन्शन योजना (PMSYM) फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु केली. या योजनेमध्ये फक्त 55 रुपये भरुन दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. सरकारनं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. आत्तापर्यंत या योजनेत 32 लाखांपेक्षा अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
योजनेत तुम्हाला त्यासाठी किती पैसे गुंतवावे लागतील, हे तुमच्या वयाप्रमाणे ठरेल. या योजनेत पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती रक्कम त्याच्या जोडीदाराला मिळण्याची सोय आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन घेणारा आपल्या खात्यात जितके पैसे टाकेल, सरकारही तेवढे पैसे खात्यात भरेल.
कोणाला मिळू शकतो लाभ
ही योजना असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी लागू आहे. यामध्ये घरकाम करणारे, चालक, प्लंबर, शिंपी, मिलमध्ये काम करणारे कामगार, रिक्षा चालक, बांधकाम साईटवर काम करणारे मजूर, कचरा वेचणारे, वीडी तयार करणारे, शेतमजूर, चांभार, धोबी, चर्मकार कामगार इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत 17 ऑक्टोबर पर्यंत 32 लाख 72 हजार 174 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
किती योगदान करू शकता?
1) तुम्ही 18 वर्षांचे असाल, तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 55 रुपयांची गुंतवणूक करु शकता.
2) तुम्ही 29 वर्षांचे असाल, तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
3) तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 200 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
या कागदपत्रांची गरज
आधारकार्ड, बचत खातं, जनधन खातं, सोबत IFSC कोड, मोबाइल नंबर
यांना मिळू शकणार नाही फायदा
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निधी (EPFO), नॅशनल पेन्शन स्किम (NPS) किंवा राज्य विमा निगम (ESIC)चे सभासद किंवा इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.