Corona Vaccine: देशाच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचेल कोरोनाची ‘लस’, सरकारनं सुरू केलं ‘प्लॅनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आजकाल संपूर्ण जगाची नजर कोरोना लसीवर लागून आहे. सध्या जगभरात 140 लसींवर काम सुरू आहे. यापैकी 23 लसी अशा आहेत ज्यांच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही लस जगाला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात प्रत्येक व्यक्तीकडे लस पोहोचवणे सोपे होणार नाही. म्हणून सरकारने कोरोना लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याची योजना सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार वेगवेगळ्या एजन्सीशी वेगवेगळ्या स्तरांवर बोलत आहे.

लस संदर्भात बैठक

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार भारतीय अधिकाऱ्यांनी लॉजिस्टिक्स पासून तर लसीच्या पुरवठ्यापर्यंत चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अनेक मंत्रालये आणि अधिकारी सहभागी झाले होते. त्यांना आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीच्या आधी कोणती ना कोणती लस जरूर येईल. या वृत्तपत्राने सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दावा केला आहे की, लस वितरणासंदर्भात आतापर्यंत किमान दोन बैठका घेतल्या गेल्या आहेत. येत्या आठवड्यात त्याबद्दल अधिक चर्चा होईल.

कोल्ड स्टोरेज बनवण्याची तयारी

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की या क्षणी लसीबाबत अंतर्गत सल्लामसलत सुरू झाली आहे जेणेकरून आम्ही पूर्णपणे तयार राहू. वास्तविक, ही सर्व कवायत शेवटच्या प्रसंगी कोणताही त्रास टाळण्यासाठी आहे. या बैठकीत मुख्य म्हणजे उत्तर-पूर्व भारतासारख्या दुर्गम भागात लसीचे वितरण करण्याबाबत चर्चा झाली आहे. ते म्हणाले की सरकार अशा भागात मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज सुविधा तयार करण्याची योजना तयार करीत आहे.

या मुद्द्यांवर होत आहे चर्चा

या लसीचे वितरण कसे करावे यावरही चर्चा सुरू झाली आहे. तसेच हे फक्त सरकारी रूग्णालयांच्या माध्यमातून दिले जावे की खाजगी रुग्णालयेदेखील त्यात समाविष्ट केली पाहिजेत. सरकारी अधिकारी या विषयावर देखील चर्चा करीत आहेत की प्रथम लसीचा डोस कोणाला देण्यात येईल? फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी किंवा देशातील वृद्ध लोक.