श्रीनगर : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार सीमेवर कुरापती काढत असून नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत आहे. पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करुन सुमारे एक तास गोळीबार केला. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रतिउत्तर दिले आहे.
पाकिस्तानने काल नौशेरा, पुंछ, उरी परिसरात नियंत्रण रेषेवर सुमारे ८ तास गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून थांबून थांबून गोळीबार करण्यात आला येत होता.
भारताने नियंत्रण रेषेपासून ५ किलोमीटरवरील सर्व गावांमधील रहिवाशांना हलविण्यास सुरुवात केली आहे. बारामुल्ला, कुपवाडा, पुंछ या भागातील शाळांना ५ मार्चपर्यंत सुट्टी आहे. या शाळांमध्ये सध्या तेथील रहिवाशांची सोय करण्यात आली आहे. समझोता एक्सप्रेस रद्द
10वी – 12 वीच्या परीक्षेतील कॉपीचा ‘पाथर्डी पॅटर्न’ !