श्रीनगर : वृत्तसंस्था – पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय़ने दिली आहे. पाकिस्तानी विमानाने भारताच्या हवाई हद्दीत राजौरीत घूसून बॉम्ब टाकल्याची शक्यता आहे. भारतीय विमानांनी त्यांना परतवून लावले आहे. अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घूसून मोठी कारवाई काल केली. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानकडून यावर काहीतरी केलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राजौरी भागात कालपासून तणाव होता. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तानच्या किमान तीन विमानांनी भारतीय हवाई हद्दीत राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी तेथे परतताना बॉम्बही टाकल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय विमानांनी त्यांना परतवून लावले असेही समोर आले आहे. परंतु भारतीय हवाई दलाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यानंतर भारतातील काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावरील प्रवासी वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात आली आहे. त्यासोबतच इतर विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आले आहे.
काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले
Airports in Leh, Jammu, Srinagar and Pathankot in high alert. Airspace suspended due to security reason. Many commercial flights on hold. pic.twitter.com/p7T3nw9ObN
— ANI (@ANI) February 27, 2019