भारतीय लष्करावर विष प्रयोग करण्याचा कट

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जवानांच्या गाड्यांवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळून मोठा हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तानच्या आयएसआय ने दहशतवाद्यांना हाताशी धरुन भारतीय सैनिकांच्या रेशनमध्ये विष कालविण्याचा प्रयोग करण्याचा कट रचला असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचे षडयंत्र आखत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा कट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात आल्याचे समजते.

विंग कमांडर अभिनंदन यांना ‘या’ खडतर परिक्षांचा करावा लागणार सामना

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी आयएसआय आपल्या काश्मीरमधील एजेंटचा वापर करु शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जवानांना पुरविण्यात येणाऱ्या रेशनबाबत आवश्यक त्या सर्व तपासण्या कडक करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. त्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.