तणावादरम्यानच पाकनं केलं ‘गजनवी’ क्षेपणास्त्राचं ‘परिक्षण’, भारताकडं ‘ही’ 4 मिसाईल पुर्वीपासुनच ‘रेडी’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वातावरण तापलेले असताना पाकिस्तानने आपल्या नवीन मिसाईलचे परीक्षण केले आहे. ‘गजनवी’ असे या बॅलेस्टिक मिसाईलचे नाव असून जमिनीपासून जमिनीवर मारा करणाऱ्या या मिसाईलची क्षमता 290 ते 320 किलोमीटर पर्यंत आहे. त्याचबरोबर 700 किलोपर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता देखील या मिसाईलमध्ये आहे.
Spokesperson, Pakistan Armed Forces, Major General Asif Ghafoor tweets, 'Pakistan carried out night training launch of surface to surface ballistic missile Ghaznavi, capable of delivering multiple types of warheads upto 290 KMs.'
— ANI (@ANI) August 29, 2019
या मिसाईलचे परीक्षण करून पाकिस्तान जगभरात तणाव असल्याचा संदेश देत आहे. यासाठी पाकिस्तानाने काराचीमधील तीन हवाई मार्ग देखील बंद केले होते. त्याचबरोबर आपल्या नौदलाला देखील त्यांनी अलर्ट राहण्यासाठी सांगितले होते. यासाठी पाकिस्तानने तीन दिवस आधीच भारताला याची सूचना दिली होती. त्यानुसार काल रात्री त्यांनी हे परीक्षण केले आहे. मात्र पाकिस्तानने जरी या मिसाईलचे परिक्षण करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला असला तरी भारताकडे पाकिस्तानपेक्षा वेगवान आणि अधिक लांब पल्ल्याची मिसाईल असून भारताची फक्त चार मिसाईलच पाकिस्तानवर भारी पडू शकतात.
ही 4 मिसाईल पाकिस्तानच्या मिसाईलवर पडू शकतात भारी
1)अग्नि – 2 -मारक क्षमता 2000 किमी, स्फोटक वाहन क्षमता 1000 किलो
2)सागरिका – मारक क्षमता 700 किमी, स्फोटक वाहन क्षमता 500-800 किलो
3)अग्नि – 1 – मारक क्षमता 700 – 1200 किमी,स्फोटक वाहन क्षमता 2000 किलो
4)शौर्य – मारक क्षमता 700 किमी, स्फोटक वाहन क्षमता 800 किलो
- पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्या असेच ५ फायदे
- किडनी डॅमेज आहे का ? फक्त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्ट करून समजू शकते
- कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्या याचे ८ फायदे
- सकाळी लिंबूपाणी पिल्याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
- कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया
- ‘हे’ आहेत लिव्हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
- शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी
- शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक