नवी दिल्ली वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान चांगलाच संतापला आहे आणि पाकिस्तानला असे इतर देशांना असे भासवायचे आहे की भारत जम्मू-काश्मीरच्या जनतेवर अत्याचार करत आहे. पाकिस्तान जगासमोर याचिका करीत आहे, पण कोणीही त्याचे ऐकत नाही. आता इम्रान खान यांनी आपल्या देशातील लोकांना दर शुक्रवारी दुपारी 12 ते 12.30 पर्यंत जिथे जिथे असतील तेथे उभे रहाण्याचे आवाहन केले आहे.
इम्रानच्या या आवाहनावर टीका केली जात आहे, पाकिस्तानी पत्रकारांनीच इम्रानच्या या निर्णयाची आलोचना केली आहे. बर्याच पत्रकारांनी लिहिले आहे की इम्रान खान यांनी स्वतःकडे पहावे की ते स्वतःच्या देशात काय करत आहेत.
बरेच पाकिस्तानी पत्रकार सोशल मीडियावरील या आवाहनाची सतत खिल्ली उडवत आहेत किंवा टीका करत आहेत. ट्विटरवर बर्याचदा या विषयांवर लिखाण करणार्या नायला इनायत यांनीही ‘ब्रेकिंग !!’ अशी व्यंग्य लिहिताना त्या म्हणतात पाकिस्तान 12 ते 12.30 दरम्यान भारताकडून येणारी हवा व पाणी थांबवेल. अशा प्रकारची व्यंगात्मक टीका पाकिस्तानी पत्रकारांकडून इम्रान खान यांच्यावर करण्यात आली आहे.
इतकेच नाही तर, ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशी घोषणा वारंवार पाकिस्तानी नेत्यांकडून दिल्या जात आहेत. पाकिस्तान नेहमीच असे नव्हते, आम्ही चांगले दिवसही पाहिले आहेत. 1962 मध्येही आम्ही काश्मीर जिंकण्याचा प्रयत्न करीत होतो.
त्यांच्याव्यतिरिक्त आयमा खोसा यांनी लिहिले की पंतप्रधान इम्रान खान यांना असे वाटते की आपण लोकांना अशा आवाहनांशी जोडत आहात आणि स्वतःच्या सत्तेतील फॅसिस्ट दडपशाही लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जनरल बाजवाला याना जिहादसाठी LOC वर पाठवावे, असे वक्तव्य करत पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांच्यावर टीका केली. जर तो जिंकला तर काश्मीर मुक्त होईल आणि जर तो पराभूत झाला तर पाकिस्तान मुक्त होईल. असा टोला सिद्दीकी यांनी बाजवाल याना लगावला आहे.
याआधीही पाकिस्तानी पत्रकार इम्रान खानच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करतांना इम्रान खान यांनी आवाहन केले होते की आपण काश्मीरच्या जनतेबरोबर आहोत हे दाखवावे लागेल तर जग आपले म्हणणे ऐकेल.
BREAKING!!! Pakistan to stop air and water coming from India at 12 to 12:30pm.
— Naila Inayat (@nailainayat) August 29, 2019
کسی نے کیا ہی خوبصورت تجویز دی ہے: جنرل باجوہ کو بارڈر پر جہاد کیلیے بھیج دیا جائے۔ جیت گئے تو کشمیر آزاد ہار گئے تو پاکستان آزاد!
What a great idea: General Bajwa shud b sent to LoC for jihad. If he wins, Kashmir will b free but if he loses, Pakistan will b free!
🤣😂🤭
— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) August 29, 2019
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा