PAK ला मोठा झटका ! UNGA प्रमुखांसमोर उपस्थित करणार होते काश्मिरचा मुद्दा, यात्राच झाली रद्द
नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय मंचांवर पुन्हा एकदा ‘काश्मीर राग’ छेडून भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA)75 व्या अधिवेशनासाठी निवडलेले अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांचा पाकिस्तान दौरा तहकूब करण्यात आला आहे. इमरान खानची योजना अशी होती की, वोल्कन बोजकिर यांच्या पाकिस्तान दौर्यावेळी ते काश्मीर प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतील, पण आता त्यांच्या योजनेवर पाणी फिरताना दिसत आहेत. विमानात काही तांत्रिक अडचणींमुळे ते सध्या पाकिस्तानचा प्रवास पुढे ढकलत असल्याचे बोजकीर यांनी रविवारी सांगितले.
पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या निमंत्रणानुसार बोजकीर 26-27 जुलै रोजी पाकिस्तान दौर्यावर येणार होते. विमानात काही तांत्रिक अडचणींमुळे कुरेशीच्या आमंत्रणानुसार, 27-27 जुलै रोजी होणारी आमची पाकिस्तान यात्रा पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे बोजकीर यांनी ट्विट केले. तुर्की मुत्सद्दी बोझकीर म्हणाले, “मी नजीकच्या काळात पाकिस्तान भेटीची अपेक्षा करतो आणि संयुक्त राष्ट्रांच्या 75 व्या महासभेच्या अजेंडावरील मुद्द्यांवर आणि प्राधान्यक्रमांवर अर्थपूर्ण चर्चेची अपेक्षा करतो.” यावर कुरेशी म्हणाले की, ‘रचनात्मक व परिणामी देणारं प्रवास’यासाठी बोजकीर यांचे पाकिस्तानमध्ये स्वागत आहे अशी आशावादी आहे. विशेष म्हणजे, कुरेशी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ते काश्मीरसह विविध मुद्द्यांवर बोजकीर यांच्याशी चर्चा करतील.
I look forward to welcoming you to Pakistan soon for a constructive and fruitful visit. https://t.co/AGB0uod7vr
— Shah Mahmood Qureshi (@SMQureshiPTI) July 26, 2020
2) I am hoping to visit Pakistan in the near future and looking forward to a fruitful exchange with the Pakistani authorities, regarding the issues & priorities on the United Nations 75th General Assembly agenda. 🇺🇳🇹🇷🇵🇰
— Volkan BOZKIR (@volkan_bozkir) July 26, 2020
काश्मीरवर बोलण्याची घोषणा केली होती
इम्रान सरकारचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी घोषणा केली की, बोजकीर यांच्या पाकिस्तान दौर्यादरम्यान काश्मीरच्या मुद्दयावर ते त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करतील. कुरेशी म्हणाले होते की, आम्ही भारत-व्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होणाऱ्या अत्याचाराबद्दल युएनजीए अध्यक्षांना सांगू. सूत्रांनी हवाला देत सांगितले की, इम्रान सरकार बर्याच काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद वाढविण्यासाठी अशा संधीची वाट पाहत होते. हे पाहता युएनजीए अध्यक्षांना पाकिस्तान येथे बोलविण्यात आले. बोजकीरशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना कुरेशी म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती यूएनजीएमध्ये आणण्याकडे त्यांचे लक्ष असेल.