PAK कडून शस्त्रसंधीचे ‘उल्लंघन’, प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ‘पाक’चे 2 सैनिक ठार

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत शनिवारी पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. लष्करी सुत्रांनी ही माहिती दिली आहे. सुत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैनिकांनी पल्लनवल्ला व अखनूर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावर भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले आहे.

सुत्रांनी सांगितले की, सकाळी भारतीय सैन्याला नियंत्रण रेषेजवळ दोन मृतदेह सापडले. परंतु, सीमेवर ताणवपूर्ण स्थिती असल्याने अन्य माहिती मिळू शकली नाही.

भारतीय लष्काराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उध्वस्त केली. मात्र, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या परिसरात सीमेवर अद्यापही गोळीबार सुरूच आहे. याबाबतची अधिक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हटविल्यापासून सीमेवर अशांतता आहे. तेव्हापासून अनेकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण दिडपट वाढले आहे. सीमेवर सतत अशांतता निर्माण करण्याचे पाकचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जवान आणि नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/