काश्मीरमध्ये मुस्लीमांवर अत्याचार होत आहेत म्हणून ‘गप्प’, इम्रान खानचा UN वर ‘गंभीर’ आरोप !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचे हतबल झालेले पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री एकामागून एक द्वेषपूर्ण विधाने करत आहेत. आज देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी शुक्रवारी इस्लामिक कार्डचा मुद्दा उकरून काढला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे इम्रान म्हणाले. काश्मिरी नागरिक मुस्लिम असल्यानेच संयुक्त राष्ट्र गप्प आहे असा गळा त्यांनी काढला.
पीओकेमध्येही भारत बालाकोटसारखे काहीतरी करू शकतो :
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायावर आरोप केला की जर काश्मीरमध्ये मुस्लिम नसते तर संपूर्ण जगाने याविरोधात आवाज उठवला असता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्र संघ मुसलमानांवरील अत्याचाराच्या ठिकाणी शांत बसतात. इतकेच नव्हे तर एकदा बालाकोटमध्ये भारतीय सैन्याच्या कोणत्याही कारवाईला नकार देणारे इम्रान खान आज मात्र म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारत बालाकोटसारखे काहीतरी करू शकतो.
RSS वरही काढला राग :
कश्मीर मुद्द्यावर हतबल झालेल्या इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) राग काढला. आरडाओरड करतांना सांगितले की आपल्याला त्यांची विचारसरणी समजून घ्यावी लागेल. हा द्वेषमूलक भावनेतून जन्मलेला एक गट असून हिंदू त्याला आदर्श आणि उत्तम मानतात. आरएसएसला भारतातील मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून ठेवण्याची इच्छा आहे. काश्मीरमध्ये काय घडत आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. एकीकडे इम्रानने संयुक्त राष्ट्रावर संताप व्यक्त केला आणि दुसरीकडे त्यांनी असेही म्हटले की ते पुन्हा जागतिक संघटनेच्या वार्षिक बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतील.
The Pakistani nation has also let the world know about the Nazi-style takeover of India by the RSS-BJP's Hindu Supremacist ideology & the danger it poses not only to the region but the world.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 30, 2019
काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थित करणार :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, संयुक्त राष्ट्र महासभेतही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा मुद्दा मी उपस्थित करीन. ते म्हणाले की मी युरोपमधील नेते, ट्रम्प आणि इस्लामिक देशांचे नेते यांना काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दल सांगितले आहे. जर जग आज सामान्य काश्मिरींसाठी उभे राहिले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर