नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान सरकारकडून भारताबाबत व्देष व्यक्त केला जात आहे. समझोता एक्सप्रेस आणि लाहोर-दिल्ली बससेवा पाककडून रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडून पाकिस्तानने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. एवढावरच न थांबता पाकिस्तानी सरकारने आता एक फतवा काढला असून भारतीय जाहिराती दाखविण्यास पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडियाला बंदी घलण्यात आली आहे.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (pemra) भारताकडून निर्माण करण्यात आलेल्या तसेच भारतीय कलाकार असलेल्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. याबाबत पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने एक परिपत्रक काढलं आहे. टीव्हीवर भारतीय कलाकारांना पाहून पाकिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत असे त्या पत्रकामध्ये नमुद करण्यात आलं आहे. सनसिल्क शॉपू, डेटॉल साबण, सर्फ एक्सेलसह इतर काही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी पाकिस्तानने बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात भारतीय सिनेमे आणि जाहिरातींवर बॅन आणला होता.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या