प्रेमविवाहानंतर झालेल्या वादातून पत्नीचा खून

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामध्ये आपसात वाद झाले. याच वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत पोबारा केला आहे. विशेष म्हणजे प्रेमविवाह केल्याच्या रागातून दीड वर्षापूर्वी मयत मुलीच्या आई-वडीलांनी मुलाच्या आईचा दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणात मुलीच्या आई-वडीलांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परभणीत खळबळ उडाली आहे.

परभणी शहरातील पंचशील नगर येथे राहणारा अनंद खंदारे याचे शेजारी राहणाऱ्या मयुरी वाकळे या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यातूनच या दोघांनी दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर मयुरीची आई आणि वडील चंद्रकांत वाकळे यांनी अनंदची आई गयाबाई खंदारे हिचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी मयुरीची आई व वडील चंद्रकांत वाकळे हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
काही दिवसांपूर्वी मयुरीच्या आईचा जामीन झाला आहे. मात्र, तिचे वडील अद्याप कारगृहातच आहेत. मंगळवारी रात्री मयुरी आणि अनंत यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अनंतने मयुरीचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर अनंद खंदारे हा पसार झाला आहे. या घटनेमुळे परभणी शहरात खळबळ उडाली आहे. अनंदने आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पत्नी मयुरीचा खून केला की वादातून खून केला याचा शोध पोलीस करीत आहेत.