भारत-पाकिस्तानातील तणावाबाबत दक्षिणात्य अभिनेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

अमरावती (आंध्रप्रदेश) : वृत्तसंस्था – देशात तणावाचे वातावरण असताना दक्षिण चित्रपटांमधील प्रसिद्ध कलाकार पवन कल्याणने खळबळजनक वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकांआधी युद्ध होईल, असं भाजपच्या नेत्यांनी मला दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं,  असं खळबळजनक दावा जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

युद्ध कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही आणि युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनी यावेळी भाजपवर टीकाही केली. भाजप एकटाच देशभक्त असल्यासारखे वर्तन करतोय. मात्र देशभक्ती केवळ एकट्या भाजपचीच नाही. तर आम्ही त्यांच्यापेक्षा 10 पटीने देशभक्त आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, पुलावामा येथे झालेल्या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नेमक तणावाच्या काळात पवन कल्याण यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली असून तणाव वाढण्याची शक्यता आहे.