मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेला घेऊन अनेक नाट्यमय घडामोडी होताना दिसत आहेत. अशात आज जी घटना झाली त्याने तर पूर्ण महाराष्ट्रच चकित झाला. आज देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि गटासह सत्ता स्थापनेचा दावा केला. फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित होते.
सध्या राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडींवर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. सोनालीनं ट्विट करत म्हटलंय की, “पवार playशिवाय जिंकता येत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असो किंवा मग क्रिकेट विश्वचषक फायनल असो.” असं सोनालीनं म्हटलं. इतकेच नाही तर, “या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?” असा सवालही तिनं आपल्या ट्विटमध्ये विचारला आहे.
‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही….
असं दिसतंय…
क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?
— सोनाली (@meSonalee) November 23, 2019
एका युजरनं सोनालीच्या या ट्विटवर कमेंट करत तिला सुनावलं. “तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका. नाहीतर #जनता सगळ्यांना जागा दाखवते” असं त्या युजरनं म्हटलं आहे.
तुम्ही खूप इंटरेस्ट दाखवताहेत #पुन्हांनिवडणूक आता हे आपली image वेगळी आहे ती या राजकारणात आणून खराब करू नका
नाहीतर #जनता सगळ्यांना जागा दाखवते— सागर (@Sagar28343544) November 23, 2019
या युजरला सोनालीनं चांगलंच उत्तर दिलं. सोनाली म्हणाली, “का? कलाकार हे या राज्याचे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये?”
का? कलाकार हे या राज्याजे नागरिक नसतात का? आम्हाला राज्यात काय चालू आहे यात इंटरेस्ट का नसावा? आणि त्यावर मत का मांडू नये?
— सोनाली (@meSonalee) November 23, 2019
याशिवाय सोनालीच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा