माझ्या अटकेसाठी लोकांचा पैसा खर्च केला जातोय, विजय मल्ल्याचा सरकारवर हल्लाबोल 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या मल्ल्याने आपली १३ हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केला आहे. ९ कोटींचे कर्ज बुडवले असता माझ्या संपत्तीतून १३ हजार कोटी सरकारने जप्त केल्याचा आरोप मल्ल्याने केला आहे. याबरोबरच माझी संपत्ती जप्त केली ते केली वर सरकारने माझ्याविरोधात लढण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांचे वकील दिले आहेत. या वकिलांकडून नको ते आरोप केले जात आहेत. या कायदेशीर प्रक्रियेवर लोकांचा जो पैसा खर्च केला जातोय त्याला जबाबदार कोण आहे असे म्हणत सरकारवर विजय मल्ल्याने हल्लाबोल केला आहे. असे ट्विट करून तो सरकारची दिशाभूल तर करू पाहत नाही ना ? असा सवाल निर्माण होत आहे.

विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण १३ हजार कोटींची संपत्ती जप्त करून माझ्यासोबत अन्याय झाला आहे असे मल्ल्याने म्हंटले आहे. जप्तीबाबत बोलताना मल्ल्याने ट्विट केले आहे की, ‘दररोज सकाळी उठतो तेव्हा एक नवी संपत्ती जप्त केल्याचं कळतं. बँकांच्या कर्जाची व्याजासह रक्कम अगोदरच वसूल झाली आहे. पण अजून हे किती दिवस चालणार आहे आणि त्यापुढे काय असेल’ ? असा सवाल विजय मल्ल्यान केलाय. एकापाठोपाठ ट्वीट करत त्याने हे दावे केलेत.

एवढी संपत्ती जप्त करुनही बँकांनी माझ्याविरोधात लढण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांचे वकील दिले आहेत. या वकिलांकडून नको ते आरोप केले जात आहेत. या कायदेशीर प्रक्रियेवर लोकांचा जो पैसा खर्च केला जातोय त्याला जबाबदार कोण आहे, असं म्हणत विजय मल्ल्याने सरकारला सवाल करण्याचा प्रयत्न केलाय.

एवढी संपत्ती तर जप्त केली आहेच, पण भारतातलं कर्ज चुकवण्यासाठी माझ्याकडे ब्रिटनमध्येही पैसे मागितले जात आहेत. हे सर्वात मोठं दुर्दैवं आहे, असंही विजय मल्ल्या म्हणालाय. विजय मल्ल्यावर विविध बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. कर्ज देण्यास असक्षम ठरल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. इंग्लंडमधील वेस्टमिन्सटर कोर्टाने विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. पण मल्ल्या वरिष्ठ न्यायालायत या निर्णयाला आव्हान देणार आहे. वरिष्ठ न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच मल्ल्याला भारतात आणलं जाईल.