‘नक्षलवादी-दहशतवादी’ हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या जास्त : नितीन गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हाणामारी, हल्ले, नक्षलवादी-दहशतवादी हल्ले यांच्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची माहित केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चेदरम्यान गडकरी बोलत होते. देशामध्ये रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे १.५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात रस्ते अपघातात होणारे मृत्यू आणि त्यांची संख्या पाहता ही बाब चिंताजनक आहे. हे अपघात रोखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आला असल्याचे गडकरी यांनी राज्यसभेत सांगितले. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण ४० टक्के आहे. महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी महत्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. देशभरात ३० टक्के वाहन परवाने बनावट आहेत. एखादी व्यक्ती चार-चार परवाने प्राप्त करू शकते असे गडकरी यांनी यावेळी नमूद केले. राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकारावर आम्हाला गदा आणायची नाही. हा राजकीय मुद्दा नाही मात्र, बेकायदा गोष्टी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने कायदे करण्याची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
- दिव्यांच्या अमावास्येला ‘अशी’ करा दिव्यांची स्वच्छता
- ‘या’ गंभीर आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळेत करा ‘या’ १० तपासण्या
- कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवर ‘काळे जिरे’ गुणकारी, जाणून घ्या
- बॅड कोलेस्टेरॉलसाठी कर्दनकाळ आहेत ‘या’ ७ भाज्या, जाणून घ्या
- दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या
- ‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !
- लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा
- ‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
- ‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा
- ‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या