मोदी सरकार शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करणार 60 हजार कोटी, तुम्हाला मिळाले नसतील तर ‘असा’ लाभ घ्या, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत देशात 7.45 कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. परंतू यातील फक्त 2.99 कोटी शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्याचा लाभ घेता आला. याप्रकारे देशातील 11.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत शेवटच्या हप्त्यातील पैसे पोहचले नाही. अशा शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पैसे पोहचवण्याच्या प्रयत्नात केंद्रीय कृषी मंत्रालय आहे. केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या मते पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यात 27 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली आहे. म्हणजेच पुढील काही महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये 60 हजार कोटीचा आणखी फंड येणार आहे.
14.5 कोटी शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्यात पैसे देण्यासाठी 87 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. शेतकऱ्यांचे आधार बँक खात्यांना लिंक नसल्या कारणाने पैसे वेळेत पोहचत नाहीत. यामुळे सरकारने 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याची सूट दिली आहे. परंतू तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले. या योजनेंतर्गत आधार सीडिंग मध्ये सूटीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली. कैलास चौधरी यांनी सांगितले की यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पैसे खात्यात जमा होतील, जे या अनिवार्यतेमुळे आता पर्यंत लाभापासून वंचित होते.
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या कॅबिनेट बैठकीत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना किसान सन्मान निधीचा लाभ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पहिल्यांदा ही योजना छोट्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती ज्यांच्याकडे पाच हेक्टर जमीन आहे, यामुळे या निधीवर 75 हजार कोटी रुपयांनी बजेट वाढवून 87 हजार कोटी करण्यात आले.
जर पैसे मिळाले नसतील तर करा हे काम –
जर या योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पोहचले नसतील तर सर्वात आधी आपल्या रेव्हेन्यू अधिकारी आणि योजना नोडल अधिकऱ्याला संपर्क करा. तेथे काम झाले नाही तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान पीएम किसान हेल्प डेक्स ला [email protected] यावर ईमेल पाठवून संपर्क साधा. तेथे देखील काम झाले नाही तर 011-23381092 या फोनवर संपर्क साधा. तुम्ही योजनेच्या वेलफेअर सेक्शन मध्ये देखील संपर्क साधू शकतात. फोन नंबर आहे 011-23382401, तर ईमेल आहे [email protected] यावर तुम्ही संपर्क साधून शंकेचे निवारण करुन घेऊ शकतात.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी