मोदींनी ३०० दहशतवादी मारल्याचा दावा कधीच केला नाही…! 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवाई दलाकडून करण्यात आलेला हल्ला हा फक्त इशारा देण्यासाठी होता. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 दहशतवादी मारल्याचा दावा कधी केलाच नाही, असे केंद्रीयमंत्री एस.एस.अहलुवालिया यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते.  तसेच या हल्‍ल्‍याचा बदला घेत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्‍या बालाकोटमध्‍ये जाऊन हवाई हल्‍ला केला. आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्‍या तळांना नेस्‍तनाबूत केले आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाईत 300 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून दिले जात होते. मात्र, आता अहलुवालिया यांनी प्रसारमाध्यमांतून देण्यात आलेले वृत्त खोडून काढले आहे.

याबाबत अहलुवालिया म्हणाले, की ”एअर स्ट्राईकच्या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त मी माध्यमांमध्ये पाहिले. मात्र, मोदीजी किंवा भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्याने याबाबत काहीही सांगितले नाही. तसेच अमित शहा यांनीही सांगितले नाही? ”