PM मोदींच्या घरी जमले बॉलिवूडमधील ‘सेलिब्रेटी’, ‘किंग’ शाहरुख – आमिर खाननं दिलं पंतप्रधानांना ‘वचन’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण निवास स्थानावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या. यावेळी कार्यक्रमासाठी शाहरुख खान, आमिर खान, सोनम कपूर, कंगना राणावत, जॅकलिन फर्नांडिस, इम्तियाज अली, एकता कपूर, अनुराग बसून अशा दिग्गजांसहित अनेक कलाकार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी केले हे आवाहन
पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले की, महात्मा गांधीजींचे विचार दूर दूरपर्यंत पोहचलेले आहेत. ते म्हणाले की रचनातनमकतेची शक्ती अफाट आहे आणि आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेव्हा महात्मा गांधींच्या आदर्शांना लोकप्रिय करण्याचा विचार केला, तेव्हा चित्रपट आणि दूरदर्शनच्या जगातल्या अनेकांनी चांगले काम केले. या दरम्यान पीएम मोदी यांनी या सेलिब्रिटींना दांडी येथील संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले.
Our film and entertainment industry is diverse and vibrant.
Its impact internationally is also immense.
Our films, music and dance have become very good ways of connecting people as well as societies.
Here are more pictures from the interaction today. pic.twitter.com/711sKni29l
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2019
काय म्हणाले बॉलिवूड कलाकार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्र चांगले काम करत आहे त्यावर शारुख, आमिर, कंगना आणि एकता कपूर यांनी एका व्हडिओ संदेश द्वारे पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे कौतुक केले आहे.
Our film and entertainment industry is diverse and vibrant.
Its impact internationally is also immense.
Our films, music and dance have become very good ways of connecting people as well as societies.
Here are more pictures from the interaction today. pic.twitter.com/711sKni29l
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2019
पंतप्रधानांसोबत जमले सर्व कलाकार
यावेळी आमिर खान म्हणाले की, ‘बापूंचे आदर्श लोकप्रिय करण्याचा विचार करण्याबद्दल पंतप्रधान मोदींची प्रशंसा करायचे आहे. सर्जनशील लोक म्हणून आपण बरेच काही करू शकतो. मी पंतप्रधानांना आश्वासन देतो की आम्ही यावर अधिक लक्ष केंद्रित करू. किंग खान शाहरुख खान म्हणाले, ‘एका व्यासपीठावर सर्वांना एकत्र केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. मला वाटते की आपल्याला गांधीजींशी भारत आणि जगाची नव्याने ओळख करून द्यावी लागेल. पंतप्रधानांनी या कार्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून एक जबाबदारीची भावना व्यक्ती केली असल्याचे आनंद एल राय यांनी म्हंटले.
Thank u @narendramodi for hosting us & having such an open discussion on #ChangeWithin & the role artistes can play in spreading awareness of the msgs of The Mahatma. Also the idea of a University of Cinema is extremely opportune! pic.twitter.com/kWRbNk3xzo
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 19, 2019
या आधी पानपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हंटले होते की, बापूंच्या स्वप्नांतला भारत, जो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या आदर्शांवर चालणार आहे. बापूंच्या राष्ट्रवादाचे हे सर्व घटक संपूर्ण जगासाठी आदर्श असतील, राष्ट्रपिताची मूल्ये स्थापित करण्यासाठी, मानवतेच्या भल्यासाठी, प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रवादाचा प्रत्येक संकल्प सिद्ध करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज मी देशाला ‘एक व्यक्ती – एक संकल्प’ करण्यासाठी उद्युक्त करतो.
visit : Policenama.com
- स्त्रियांनी रक्तदान करावे का ? जाणून घ्या रक्तदानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती –
- ‘नॉर्मल डिलिव्हरी’पेक्षा ‘सिझर’ अधिक सुरक्षित ! काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या –
- तुमच्या मुलास ‘मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी’ तर नाही ना ! अशी घ्या काळजी –
- ‘फिटनेस’साठी सेवन करा ‘हे’ व्हिटॅमिनयुक्त पदार्थ, धावपळीतही रहाल तंदुरूस्त! –
- पिझ्झा, बर्गर, स्पाघेटीच्या अतिसेवनाने होऊ शकतो ‘अल्झायमर’, जाणून घ्या –
- ‘व्हिटॅमिन ए’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो टीबी, डोळ्यांच्या समस्याही वाढतात –