अयोध्येत PM मोदी लावणार पारिजातकाचं झाड, जाणून घ्या त्याचं पौराणिक महत्व

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उद्या म्हणजेच ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन करतील. यावेळी, पीएम मोदी श्री रामजन्मभूमी परिसरामध्ये पारिजातकाचे वृक्ष लावतील. दरम्यान , या वनस्पतीचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय आहे, ज्यामुळे त्यास भूमिपूजन सोहळ्याचा भाग बनविण्यात येत आहे. जाणून घेऊया या दिव्य झाडाबद्दल …

पारिजातकाचे वृक्ष खूप सुंदर असते. पारिजातकाच्या फुलाचा उपयोग भगवान हरिच्या शोभेत आणि पूजेमध्ये केला जातो, म्हणूनच या मोहक व सुवासिक फुलांना ‘ हरसिंगार ‘ असेही म्हणतात. हिंदू धर्मात हे झाड फार महत्वाचे मानले जाते. हे देखील मानले जाते की, पारिजातकाच्या केवळ स्पर्शानेच एखाद्या व्यक्तीचा थकवा दूर केला जातो. हे झाड दहा ते पंचवीस फूट उंच असते. या झाडाची एक खास गोष्ट म्हणजे यावर मोठ्या प्रमाणात फुले असतात. एका दिवसात कितीही फुले तोडली तरी, दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात फुले येतात. हे झाड विशेषत: मध्य भारत आणि हिमालयातील सखल डोंगरावर वाढते.

या झाडाची फूल रात्री उमलतात आणि सकाळ होताच ती फुले खाली पडतात. म्हणून त्याला रातराणी देखील म्हटले जाते. हरसिंगार फूल हे पश्चिम बंगालचे राज्य फूल आहे. जगातील याच्या केवळ पाच प्रजाती आढळतात. असे म्हणतात की, धनाची देवी लक्ष्मीला परिजातची फुले खूप प्रिय आहेत. पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला ही फुले अर्पण केल्याने तिला आनंद होतो. खास गोष्ट अशीही आहे की, पूजा- पाठ वेळी परिजातच्या केवळ त्याच फुलांचा उपयोग केला जातो, हे झाडावरुन खाली पडतात. पूजेसाठी झाडावरील फुले तोडण्यास पूर्णपणे मनाई आहे. असे मानले जाते की, १४ वर्षांच्या वनवासात सीता माता हरसिंगार फुलांनीच स्वत: चा शृंगार करायच्या.

बाराबंकी जिल्ह्यातील पारिजात वृक्ष महाभारत काळातील मानले जाते, जे सुमारे ४५ फूट उंच आहे. अशी मान्यता आहे कि, या पारिजात वृक्षाचा उगम सागर मंथनातून झाला होता, जे इंद्राने आपल्या वाटिकेत लावले होते. असे म्हणतात की अज्ञातवासात, माता कुंती यांनी पारिजात फुलाने शिवची उपासना करण्याची इच्छा व्यक्त केली. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनाने हे झाड स्वर्गातून आणले आणि ते येथे स्थापित केले. तेव्हापासून या झाडाची पूजा केली जात आहे.

हरिवंश पुराणात पारिजातकास कल्पवृक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की, स्वर्गात याला स्पर्श करण्याचा अधिकार उर्वशी नावाच्या अप्सरेलाच होता. या झाडाच्या स्पर्शाने उर्वशीचा सर्व थकवा मिटायचा. आजही लोकांचा असा विश्वास आहे की त्याच्या सावलीत बसून सर्व थकवा दूर होतो.

पारिजात हे औषधी गुणांसाठी देखील ओळखले जाते. दररोज त्याचे एक बी खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो. त्याची फुलं हृदयासाठी चांगली मानली जातात. फुलांचा रस घेतल्यास हृदयरोग टाळता येतो. एवढेच नाही तर पारिजातकाच्या पानांचा रस मधात मिसळल्यास कोरडा खोकलाही बरा होतो. पारिजात पान देऊन त्वचेशी संबंधित आजार बरे होतात.