यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ फेब्रुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यवतमाळमधील पांढरकवडा येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत मोदींनी नागरिकांना पुलवामामधील हल्ल्याच्याबाबतीत थोडा धीर धरण्यासाठी सांगितलं आहे. दौऱ्यात मोदींच्या हस्ते यवतमाळसह धुळ्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींसह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते.
भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांना भारतीय लष्कर शिक्षा देईल. त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी, त्यांना शोधून त्यांचा हिशेब चुकता केला जाईल. परंतु नागरिकांनी थोडा धीर धरायला हवा, असं मोदी यांनी सांगितलं आहे.
देशाच्या प्रगतीसाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात भारताचे आतोनात नुकसान झाले आहे. सर्व भारतीयांना त्याचे दुःख आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रानेदेखील त्यांचे दोन वीर जवान गमावले आहेत. शहीदांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
ज्यांनी भारतावर हा भ्याड हल्ला केला, ते कुठेही लपले तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. भारतीय सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफ जवानांच्या रागाने परिसिमा गाठली आहे. मी त्यांची भावना समजतो. त्यामुळेच सरकारने जवानांना संपूर्ण सुट दिली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Prime Minister Narendra Modi in Yavatmal, Maharashtra: Terror organisations who have committed this crime, no matter how much they try to hide, they will be punished. Security forces have been given full freedom. #PulwamaAttack pic.twitter.com/ULPOSUH3w2
— ANI (@ANI) February 16, 2019