PM मोदींच्या ‘रामकृष्ण मिशन’च्या बेलूर मठातील ‘त्या’ वक्तव्यावरून नवा ‘वाद’

बेलूर : वृत्तसंस्था – नुकत्याच प्रकाशित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकामुळे देशात वादंग उठले असताना नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात केलेल्या राजकीय विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोदींनी सीएए बद्दल केलेल्या विधानाचा मिशनशी संबंधित अनेकांनी निषेध केला असून काहींनी थेट मिशनच्या पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली, अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेलूर मठाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केले होते. मोदींच्या या विधानाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे मिशननं जाहीर केलं आहे.

मोदींनी मठाला भेट देऊन श्री रामकृष्ण ज्या खोलीत चिंतन करायचे, त्या खोलीचे दर्शन घेतले. यानंतर मोदींनी मठात भाषण केले. या भाषणात त्यांनी सीएएवर भाष्य करताना म्हटले की, या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. तसेच त्यांनी याची ग्वाही देखील दिली. त्यांचे हे विधान राजकीय स्वरुपाचे असल्याचा दावा मठात येणाऱ्या भाविकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. रामकृष्ण मिशनच्या एका सदस्याने मोदींनी केलेले वादग्रस्त राजकीय विधान अतिशय दु:खत असल्याचा म्हटले आहे.

रामकृष्ण मिशन अराजकीय संस्था आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशनच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करायला नको होता, असे मत या सदस्याने व्यक्त केले आहे. या सदस्याने दिवंगत स्वामी आत्मस्थानानंद यांच्या कडून दिशा घेतली असून नरेंद्र मोदी यांनी आत्मस्थानानंद हे आपले गुरू असल्याचा दावा केला होता.नरेंद्र मोदी यांनी आत्मस्थानानंद हे आपले गुरु असल्याचा दावा केल्यानंतर मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत पद्धत असून मोदींना कोणतीही अधिकृतपणे दीक्षा देण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच मठात येऊन कोणतेही राजकीय विधान करण्याची परवानगी त्यांना दिली नसल्याचे रॉय यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –