वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकरी, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. आम्ही कधीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उभा केला नाही. आणि तो मुद्दा जुना असून तपास यंत्रणांच्या माहितीच्या आधारावरच तो समोर आला होता. ते ९ वर्ष जुने मुद्दे आज उकरून काढत आहेत. राहूल गांधी आणि प्रियंका गांधीं यांन प्रचाराला सुरुवात केल्यापासून नरेंद्र मोदी घाबरले आहेत. असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज केले.
Former Home Min S Shinde: PM didn't speak on jobs,development&farmers' issue. We never raised issue of Hindu terrorism, been long when we did so, that also on input from intel agencies.He's digging up 9-yr-old issue today,they're scared since Rahul ji&Priyanka ji started campaign pic.twitter.com/GTAWdvTiA6
— ANI (@ANI) April 1, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यात लोकसभा प्रचाराला सुरुवात केली. या प्रचार सभेत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेसने देशात हिंदूना बदनाम केले आहे. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशातच भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद या संकल्पनेखाली देशातील हिंदूंना बदनाम केले आहे. त्यांना धडा शिकवला पाहिजे अशी टिका नरेंद्र मोदी यानी केली. त्यावर उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नोकरी, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. आम्ही कधीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उभा केला नव्हता. तो तपास यंत्रणांच्या माहितीवरूनच निर्माण झाला होता. नरेंद्र मोदी ९ वर्ष जुना मुद्दा उकरून काढत आहेत. ते राहूलजी आणि प्रियंकाजींनी प्रचार सुरु केल्यापासून घाबरले आहेत.