Mann Ki Baat : ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशवासियांना दिला इशारा, म्हणाले – ‘सावधानी हटी तो दुर्घटना घटी’
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशाला संबोधित केले आणि कोरोनाबाबत अतिविश्वास टाळायला सांगितले. कोरोना विषाणू संकटा दरम्यान रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील जनता कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत आहे. व्यवसाय असो, ऑफिस कल्चर, शिक्षण असो की वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण कोरोना व्हायरस साथीच्या आजारानंतर होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत आहे. संपूर्ण जगाचा अनुभव आपल्याला खूप काही शिकवत आहे, म्हणून आपण अति आत्मविश्वास बाळगू नये, कारण कोरोना सावधगिरी हटल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही मन की बात ची ही 64 वी आवृत्ती आहे. ‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. कोरोना व्हायरसच्या कहरात देशात लॉकडाऊन सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनची घोषणा केली, जी 14 एप्रिल रोजी संपली. त्यानंतर पीएम मोदी यांनी 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली, जो तीन मे रोजी संपणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील काही वैशिष्ट्ये :
– सावधानी न बाळगल्यास मोठी दुर्घटना
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वांनी अंतर राखून ठेवावे आणि घराबाहेर पडू नये. मी तुम्हाला आग्रह करू इच्छितो की, अति आत्मविश्वासामध्ये अडकू नका, कोरोना अद्याप आपल्या शहरात, आपल्या गावात, आपल्या गल्लीत, ऑफिसमध्ये पोहोचला नाही म्हणजे अजूनही पोहोचणार नाही, असा विचार करू नका. जगाचा अनुभव आपल्याला बरेच काही सांगत आहे आणि या दरम्यान आपल्याया सांगितले जाते की – ‘सावधगिरी बाळगली नाही, तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
India's fight against Coronavirus is people-driven. This fight is being fought by the people and the administration together. Every citizen as a soldier is fighting this war: PM Narendra Modi in 'Mann ki Baat' pic.twitter.com/k3dLk70Jlg
— ANI (@ANI) April 26, 2020
– रूमालाने तोंड झाकून ठेवणे चांगले
पीएम मोदी म्हणाले की, कोरोनामुळे बदलत्या परिस्थितीत मास्कदेखील आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक लोक मास्क घालताना दिसत आहेत, याचा अर्थ असा नाही कि, ते आजारी आहेत. आपल्याला मस्कविषयीची धारणा बदलायला हवी. मास्क आता सुसंस्कृत समाजाचे प्रतीक बनेल. जर आपल्याला आजारापासून स्वत: ला आणि इतरांनाही वाचवायचे असेल तर मास्क घालणे अनिवार्य आहे. माझा तर एक सोपा सल्ला आहे. मास्क म्हणून रुमालाने आपले तोंड झाका.
In the middle of this pandemic, the farmers are ensuring that no one sleeps hungry in our country. Each person is fighting this war as per their capacity. Some are waiving off house rent, also some labourers who are in quarantine at a school are whitewashing the school etc: PM pic.twitter.com/AFv3hWaRfW
— ANI (@ANI) April 26, 2020
-आपण औषधाच्या स्वरूपात जगाला मदत केली
पीएम मोदी म्हणाले की, आम्ही जगातील प्रत्येक गरजू देशापर्यंत औषधे पोहोचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचे हे काम करून दाखविले. आज जेव्हा मी अनेक देशांच्या प्रमुखांशी फोनवर बोलतो तेव्हा ते नक्कीच भारतीय लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जेव्हा ते लोक म्हणतात कि, ‘भारताचे आभार, भारतातील लोकांचे आभार, ‘ तेव्हा देशाबद्दल अभिमान अधिक वाढतो.
We have created a digital platform 'https://t.co/9qaVMG3gRC'- volunteers of social orgs, civil society&local administration are connected through this platform. 1.25Cr people incl doctors, nurses, NCC cadets etc have joined this platform. You can also become a COVID warrior: PM pic.twitter.com/EutEfYDhk6
— ANI (@ANI) April 26, 2020
– पंतप्रधान मोदी यांनी अध्यादेशाची करून दिली आठवण
नुकत्याच सादर झालेल्या अध्यादेशाबद्दल देशभरातील आरोग्य सेवांशी संबंधित लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. या अध्यादेशात कोरोना योद्ध्यांविरूद्ध हिंसा, छळवणूक आणि एखाद्या स्वरूपात इजा करण्याच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे. आपल्याला डॉक्टर, परिचारिका, पॅरा वैद्यकीय कर्मचारी, सामुदायिक आरोग्य कर्मचारी आणि जे लोक देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत त्यांचे संरक्षण करणे आवश्यक होते.
Due to COVID19, masks are becoming a part of our lives. It doesn't mean that all those wearing are sick. Masks will become a symbol of a civilised society. If you want to protect yourselves and others from the disease, the use of a mask is important: PM Modi during 'Mann ki Baat' pic.twitter.com/tCH9HHRSF7
— ANI (@ANI) April 26, 2020
– कोरोनामध्ये केली जातेय प्रत्येकाची मदत
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत गरीबांच्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जात आहेत.तसेच वृद्धांना पेन्शन देण्यात आली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गरीबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर, रेशन यासारख्या सुविधादेखील पुरविल्या जात आहेत. या सर्व कामांमध्ये शासनाच्या विविध विभागांचे लोक, बँकिंग क्षेत्रातील लोक पथकाप्रमाणे दिवसरात्र काम करत आहेत. या साथीला सामोरे जाण्यासाठी अतिशय सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल मी आपल्या देशातील राज्य सरकारांचेही कौतुक करीन. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार ज्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत त्यांची कोरोनाविरूद्ध लढ्यात मोठी भूमिका आहे. त्याच्या मेहनतीचे कौतुक आहे.
People are getting aware about the harmful effects of spitting in public. The time has come to end this habit now. This habit of spitting in public should be given up now: PM Modi in his 'Mann ki Baat'
— ANI (@ANI) April 26, 2020
– देश एक संघ म्हणून काम करत आहे
जेव्हा देश संघ म्हणून काम करतो, तेव्हा काय होते, आपण याचा अनुभव घेत आहोत. आज ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्यांचे प्रत्येक विभाग आणि संस्था एकत्रितपणे वेगाने काम करत आहेत. आपल्या विमानचालन क्षेत्रात काम करणारे लोक, रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस कठोर परिश्रम घेत आहेत जेणेकरून देशवासियांना कमी त्रास होईल. देशातील प्रत्येक भागात औषधे पोहोचविण्यासाठी लाईफ -लाइन उडान नावाची एक विशेष मोहीम सुरू आहे. आमच्या सहका-यांनी इतक्या अल्पावधीत देशात 3 लाख किलोमीटर हवाई उड्डाण केले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात 500 टन पेक्षा जास्त वैद्यकीय साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवले. त्याचप्रमाणे, सामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये, म्हणून आम्ही रेल्वेसोबत लॉकडाऊनमध्ये सतत काम करत आहोत.
I commend the State Governments for their proactive role in dealing with COVID19 pandemic: Prime Minister Narendra Modi during 'Mann ki Baat' pic.twitter.com/f47s3J2a3G
— ANI (@ANI) April 26, 2020
– प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार ही लढाई लढत आहे
नरेंद्र मोदी म्हणाले की, आपले शेतकरी बांधव या साथीच्या आजारात आपल्या शेतात रात्रंदिवस काम करत आहेत, जेणेकरून या देशात कोणीही उपाशी झोपू नये. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार ही लढाई लढत आहे. जर कोणी भाडे माफ करत असेल तर कोणीतरी त्यांचे संपूर्ण पेन्शन किंवा बक्षीस रक्कम पीएम केअरमध्ये जमा करीत आहे. काहीजण शेतीच्या सर्व भाज्या दान करीत आहेत तर काही शेकडो गरीब लोकांना दररोज मोफत भोजन देत आहेत. कोणी मास्क तयार करीत आहे, तर आपले काही मजूर बांधव जे शाळेत क्वारंटाईन आहेत तेथे रंगरंगोटी करत आहेत. इतरांना मदत करण्यासाठी, आपण स्वतःहून पुढे येत आहोत.
This Ramzan, we should pray more than before to ensure that before Eid the world gets rid of Coronavirus. I am sure we will strengthen this fight by following orders of the local administration: PM Modi pic.twitter.com/UEQY58vXeP
— ANI (@ANI) April 26, 2020
– देशात एक प्रचंड महायज्ञ सुरू
लोक देशभर, वेगवेगळ्या ठिकाणी, एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्यापासून ते रेशनची तरतूद किंवा लॉकडाउनचे पालन, रुग्णालयांची तरतूद, देशांतर्गत वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, आज संपूर्ण देश एका दिशेने वाटचाल करीत आहे. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, टाळी, थाली, दिवा, मेणबत्ती या सर्व गोष्टी ज्या भावनांना जन्म देतात. ज्या भावनेने देशवासीयांनी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला, त्या प्रत्येकाला प्रेरणा देत आहेत. शहर असो वा गाव, असे दिसते की देशात एक प्रचंड महायज्ञ चालू आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.
The people associated with medical services have expressed satisfaction with the ordinance that provides stringent punishment for those indulging in violence against corona warriors. It was critical to ensure the safety of all doctors, nurses and paramedical staff: PM Modi pic.twitter.com/BKJsoxS6wD
— ANI (@ANI) April 26, 2020
– जनता भारतातील कोरोनाविरूद्ध लढा देत आहे
त्यांच्या मन कि बात मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात कोरोनाविरुध्द लढा हा खरोखर पीपल ड्रायवेन आहे. भारतात, लोक कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत, शासन आणि प्रशासन एकत्र येऊन लोकांशी लढा देत आहेत. विकासासाठी धडपडणारा भारतासारखा मोठा देश गरिबांशी निर्णायक लढाई लढत आहे. त्याच्यासाठी कोरोना लढण्याचा आणि जिंकण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि आपले भाग्य आहे की आज संपूर्ण देश, देशातील प्रत्येक नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. जेव्हा संपूर्ण जग या साथीच्या संकटासह झगडत आहे. भविष्यात जेव्हा यावर चर्चा होईल, तेव्हा त्यातील कार्यपद्धतींवर चर्चा केली जाईल, मला खात्री आहे की या लोकांच्या लढ्यात भारताविषयी चर्चा होईल.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लोकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले. त्यांनी टि्वट केले की, “या कार्यक्रमासाठी लोकांकडून बऱ्याच सूचना मिळाल्या आहेत, रात्री 11 वाजता मन की बात ऐका.”
मोदींनी ‘मन की बात’च्या 63 व्या आवृत्तीत काय म्हटले?
63 व्या मन की बात आवृत्तीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संबंधित पीएम मोदी यांनी सर्वप्रथम लॉकडाऊनमुळे जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल माफी मागितली आणि म्हणाले की देश आणि देशवासियांना वाचवणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध लढा हा जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढा आहे आणि आपण ही लढाई जिंकली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आपणा सर्वांनी सामाजिक अंतर वाढविणे आणि भावनिक अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाविरूद्ध युद्धात योगदान देणार्या आघाडीच्या सैनिकांचे त्यांनी आभारही मानले.
भारतातील कोरोना स्थिती
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत. देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 26 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये गेल्या 24 तासांत सर्वात मोठी उडी दिसून आली असून 1990 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत. त्याचवेळी 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी जाहीर झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून 26496 झाली असून मृत्यूची संख्या 824 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूच्या एकूण 26496 प्रकरणांपैकी 19868 सक्रिय प्रकरणे आहेत. याव्यतिरिक्त, 5803 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.
जगभरात कोरोनाची परिस्थिती
चीनमधील वुहान शहरात सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या आजारामुळे 2.9 दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे तर 203,272 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अमेरिकेत आतापर्यंत 53,511 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, संपूर्ण जगातील 836,941 लोक या भयानक कोरोना विषाणूतून बरे झाले आहेत.