मोदींना पत्नी ना मुलगा, कोणासाठी भ्रष्टाचार करतील ? : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारालाही वेग आला आहे. या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांकडून लक्ष करण्यात येत असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. परंतु गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी विरोधाकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे. तसेच मोदींना पत्नी ना मुलगा मग ते कोणासाठी भ्रष्टाचार करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. बऱ्याच काळापासून लोकांनी पंतप्रधानांना राजकारणात सक्रिय असल्याचे पाहीले आहे. मागील पाच वर्षामध्ये त्यांनी सर्वस्व झोकून काम केले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराची एकही डाग नाही. ते भ्रष्टाचार तरी कोणासाठी करतील. कोण आहे त्यांच्या मागे ? पत्नी ना मुलगा, देशच त्यांचे कुटुंब आहे. अशा व्यक्ती शुद्धच असणार असेहे राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

विरोधकांकडून राफेल कराराप्रकरणी सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला गेला आहे. मोदींनी राफेल कराराच्या आडून अनिल अंबानी यांच्या खिशात हजारो कोटी टाकल्याचा आरोप विरोधकांना केला आहे. हे सर्व आरोप राजनाथ सिंह यांनी फेटाळले आहे.