Coronavirus Lockdown : 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर नेमकं काय करावं ? PM मोदींनी VC व्दारे दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना ‘या’ 11 ‘खास’ सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज (गुरुवार) करावयाच्या उपाययोजनांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं ? या संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत.

PM मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचना

1. देशात आतापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरले पाहिजे किंवा घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग केला पाहिजे. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.

2. लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पहावे.

3. कोरोनाचा लढा सुरु राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्त्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञानांचा उपयोग करा.

4. कोरोनाचा मुकाबला सामाना फक्त डॉक्टर करीत नाही. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करुन घ्या.

5. लोकप्रियता मिळवण्यासाठी उगाच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन पाहिजे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिद्धी मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

6. नविृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती. तज्ज्ञ यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

7. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होणार आहे. पण एकदम गर्दी होईल असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

8. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होत आहे. तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

9. 11 हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

10. आयुष मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिक्रर शक्ती वाढवण्यासाठी दिलेले उपाय आवश्य करा.

11. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळत आहेत. आपणही काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.