खळबळजनक ! वर्षभराच्या ‘रिलेशनशीप’नंतर केलं जबरदस्तीने लग्न, ‘मधुचंद्रा’च्या रात्री पत्नीला पाजलं ‘विष’

मधुबनी (बिहार) : वृत्तसंस्था – मुलीचे प्रेमप्रकरण तिच्या घरच्यांना चांगलेच महागात पडले. घरच्यांनी तिचे लग्न तिच्या प्रियकरासोबत बळजबरीने लावून दिले. मात्र, प्रियकराच्या आणि त्याच्या घरच्यांच्या मनामध्ये वेगळेच शिजत होते. लग्नानंतर मुलीला घरी घेऊन गेल्यावर पहिल्याच रात्री प्रियकराने मुलीला विष पाजून तिचा खून केला. खून केल्यानंतर पती आणि त्याचे घरचे फरार झाले. मुलीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील अरेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली अतरौली गावात घडला.
Bride
वर्षभर सुरु असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना समजल्यावर त्यांनी गावातील पंचायतीकडे दाद मागितली. गावच्या पंचायतीने दोघांचे लग्न लावून देण्याचे आदेश दिले. पंचायतीच्या आदेशानुसार दोघांचे लग्न लावून देण्यात आले. काही दिवसांनी मुलीच्या घरचे तिच्या सासरी तिला भेटायला गेले त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला भेटायला गेलेल्या घरच्यांना तिचा मृतदेह आढळून आला. तर तिचा पती आणि त्याचे आई वडील फरार झाले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, राजेश कुमार ठाकूर याचे त्याच गावातील एका मुलीसबोत मागील एक वर्षापासून प्रेम संबंध होते. ते दोघे चोरून एकमेकांना नेहमी भेटत होते. हे मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी गावातील पंचायतीकडे हे प्रकरण नेले. पंचायतीने पंचायत बसवून दोन्ही बाजू ऐकून घेत दोघांचे लग्न लावून देण्याचे आदेश दिले. पंचायतच्या आदेशानुसार दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
Honeymoon-1
मुलगी सासरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आला. तर मुलाचे घरचे फरार झाले होते. नातेवाईक भेटायला गेल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवून दिला. दरम्याम, मुलीला मारहाण करून तिला विष पाजून तिचा खून केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त