व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणारा ‘पोलीस’ गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन
व्यापाऱ्याचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेच्या मदतीने नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन त्याचे अपहरण केले होते.
[amazon_link asins=’B07D7WT3BF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc5ae587-84e6-11e8-8f11-a3b3283158bf’]वर्तकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस कॉन्स्टेबल दिपक वैरागड (33, रा. वर्तकनगर पोलीस वसाहत, ठाणे) आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी (23, रा. राबोडी, ठाणो) या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) रात्री अटक केली. याप्रकरणात त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाचीही त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

नंदूरबारमधील या अपहरण, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या काळ्या व्यवहारात ठाणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एक पोलीस शिपाई अडकल्याने संपूर्ण ठाणे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा येथील रिजवान मेमन याला खंडणीसाठी अपहरण केल्याची तक्रार त्याच्या पित्याने ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे केली.
[amazon_link asins=’B077XXRDJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a5870d4-84e7-11e8-a855-a3ddb56a9d97′]
त्यानंतर काशीमीरा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला हे प्रकरण ठाणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. मात्र, या गुन्ह्याची सुरुवात ठाणे शहर पोलिसांच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील येऊरच्या एका खोलीतून झाली. त्यामुळे हे प्रकरण आता वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.