पोलीस भाजपच्या प्रवक्त्यांसारखे बोलत आहेत : विखे पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. विचारवंतांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे. पोलीस भाजपचे प्रवक्ता असल्यासारखे बोलत आहेत. सनातनच्या जयंत आठवलेंना वेगळ्या न्याय आणि विचारवंतांना वेगळा न्याय लावला जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
[amazon_link asins=’B07417987C,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fac7536a-b381-11e8-8bc2-9d32cae08ae2′]

विखे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

भाजप गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. सनातनकडून 500 हुन अधिक तरुणांचा बुद्धिभेद करण्यात येत आहे. मोहन भागवतांनी सनातन सोबतचे आर एस एस चे संबंध एकदा स्पष्ट करावेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकार हे घोटाळेबाजांचे सरकार आहे. मोदी सरकार प्रत्येक घटकावर अन्याय करत आहे. राम कदमांच्या व्यक्तव्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. मोदी जर २०१९ ला पुन्हा निवडून आले तर लोकशाही , संविधान राहणार नाही. महाराष्ट्राचे लोक २०१४ सारखी चूक पुन्हा करणार नाहीत. सरकार चालवणे अवघड झाल्याने पेट्रोल, डिझेल चे दर वाढवण्यात येत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी