पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ,वरिष्ठ निरीक्षकाने जखमी मुलींना पोहचवले रुग्णालयात 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यात, शंभरावे वर्ष असल्याने दुपारपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविक तेथे धडकले. परिणामतः धक्काबुक्की वाढू लागली आणि गडबड गोंधळ मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. गर्दीमध्ये भक्त महिला, पुरुष, लहान मुले, पाकीटमार, टवाळखोर अशा सर्वच प्रकारचे लोक होते. पोलिसांनी शक्य तेवढा प्रयत्न गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केला. यात चार मुलींना भुरळ आली आणि त्या बेशुद्ध होऊन पडल्या.

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाऱ्याने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला. जवळपास अडीचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. याच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलींकडे पोलीस निरीक्षकांचे लक्ष गेले, त्या भुरळ येवून पडलेल्या चार मुलींना काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बसवत यांनी स्वत: उचलून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली. चेंगराचेंगरी थांबविण्यास पोलिसांना यश आले. यात झालेल्या धक्काबुकीत काही जण किरकोळ जखमी झाले. मात्र मोठी दुर्घटना टळली.

५३ मोबाईल गर्दीतून लंपास

मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती, लाखो लोक त्या ठिकाणावर येत होते पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही होता मात्र तरीही एवढ्या गर्दीचा फायदा घेऊन जवळजवळ ५३ मोबाईलची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी काळाचौकीचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त