मनोज लोहार आणि धीरज येवले या दोघांवर २००९ मध्ये चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात १६ जानेवारी रोजी मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाचे दोषी ठरवले होते. या प्रकरणी शनिवारी शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यानुसार आज या केसचा निकाल देत भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. दरम्यान, मनोज लोहार यांची जळगाव जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती.