‘चोखणदळ’ महिलेनं प्रियकराच्या साथीनं पतीचे केले ‘तुकडे-तुकडे’, 9 वर्षानंतर ‘गुढ’ उकललं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या एका प्रकरणाचा पोलिसांनी उलगडला केला आहे. 2011 मध्ये अपहरण आणि खूनाच्या प्रकरणाचा 9 वर्षांनी छडा लावला आहे. या प्रकरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून त्याचे तुकडे-तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून पोलिसांना 9 वर्षांनी मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षाय रिक्षाचालक रवी याचा 2011 मध्ये अपहरण करून खून करण्यात आला होता. रवीचा खून त्याची पत्नी आणि तिचा प्रियकराकडून करण्यात आला होता. रवीच्या पत्नी शकुंतला आणि तिचा प्रियकर कमल यांचे 2010 मध्ये प्रेमसंबध जुळले. त्या दोघांना लग्न करायचे होते पण शकुंतलाच्या कुटुंबीयांना हे मान्य नसल्याने त्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिली.

शकुंतलाच्या घरच्यांना त्या दोघांचे संबंध मान्य नसल्याने त्यांनी रिक्षाचालक रवीसोबत शकुंतलाचे लग्न लावून दिले. रिक्षा चालवून तो आपला उदनिर्वाह करत होता. लग्नानंतर शकुंतला एक दिवसही सासरी राहिली नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती माहेरी आली आणि तिची गाठ कमलशी झाली. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांच्या प्रेमात अडथळा असलेल्या रवीचा काटा काढण्याचा प्लॅन केला.

प्लॅननुसार पतीला मारण्यासाठी शकुंतला पुन्हा सासरी आली. तिने रवीला आपण बाहेर जाऊयात असे सांगून रवीला गाडीत बसवलं. गाडीत बसवल्यानंतर दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. हे कोणाला कळू नये यासाठी रवीचा मृतदेह पुरला. पण त्यानंतर त्याचा शोध सुरु झाल्यामुळे कमलने पुरलेला रवीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचे तुकडे करुन पुरले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस रवीचा शोध घेत होते. अखेर 9 वर्षानंतर रवीच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना सापडले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Visit  :Policenama.com