गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत : खासदार बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असून यामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी पोलिसांनी अगोदर राजकीय गुन्हेगारीचा बिमोड करावा, राजकीय हस्तेक्षपाला आळा घालावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तसेच तडीपार गुंड राजरोसपणे शहरात फिरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a2a4ae4-c7de-11e8-9ab4-cbb992b2d571′]

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात यावी यामागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची भेट घेतली. आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, विजया चव्हाण, विद्या जाधव, वैशाली कुलथे, भाग्यश्री म्हस्के, बाळासाहेब वाल्हेकर, भरत साळुंखे, सर्जेराव मारमोरे, उमेश रजपूत, रामदास केंदळे शिष्टमंडळात होते.

[amazon_link asins=’B016EOZ7OO,B01L3I1BF0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a44a4cd9-c7de-11e8-9665-c71a7d30630c’]

खासदार बारणे म्हणाले, ‘राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच शहरातील सामूहिक गुन्हेगारी वाढली आहे. राजाश्रय मिळत असल्याने गुंडाची दहशत वाढली आहे. यामुळे औद्योगिक पट्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे हा राजश्राय मोडित काढणे करणे गरजेचे आहे. राजाश्रय मोडित काढल्याशिवाय शहरातील गुन्हेगारी कमी होणार नाही. तडीपार केलेले गुन्हेगार राजरोसपणे शहरात वास्तव्य करतात. वाकड, थेरगाव परिसरात सर्रासपणे तडीपारांचा वावर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध धंदे जोरात सुरु आहेत. पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पिडीताला पोलिसांकडून योग्य वागणूक दिली जात नाही.

‘औद्योगिकनगरीची ओळख पुसली जाऊ लागली असून बलात्कार, गुन्हेगारांचीनगरी अशी ओळख होऊ लागली आहे. हे अतिशय निंदणीय आहे. औद्योगिक पट्‌यात दहशत माजविली जात आहे. त्यामुळे उद्योग धंदे शहराबाहेर जात आहेत, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही बारणे म्हणाले.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b220eed7-c7de-11e8-ab38-5980b4ba0bef’]

आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, ‘पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरु आहेत. दारु, मटक्यांचे अड्डे चालतात. पोलिसांना अवैध धंद्याची संपूर्ण माहिती असूनही त्यांच्याकडून त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. गजाजन चिंचवडे म्हणाले, ‘चिंचवड पोलीस ठाण्यासमोरच ओपन बार सुरु आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे’. अॅड. उर्मिला काळभोर म्हणाल्या, ‘पोलीस ठाण्यातील दक्षता समित्या कार्यान्वित करण्यात याव्यात. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक असावी’.

पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन म्हणाले, ‘गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. कामचुकार अधिका-यांच्या बदल्या केल्या असून गुणवत्तेवर अधिका-यांच्या नेमणूका केल्या जात आहेत. गुणवत्ताधारक पोलिसांचा हेतू चांगला राहील. तडीपार गुंडाची माहिती काढण्यात येत आहे. त्यांच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता असून केवळ दीड हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत’.

[amazon_link asins=’B00VT8CUHS,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc3afa9d-c7de-11e8-961a-9fc13745f99a’]