भाजपच्या सत्तेत येण्याच्या विधानांचा नवाब मलिकांकडून समाचार, ‘…म्हणून भाजपकडून सत्तेत येण्याची तारीख पे तारीख’ (व्हिडीओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तकांच्या चर्चांनी राजकीय (Political) वातावरण ढवळून निघालं आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकीय (Political) वर्तुळात सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे लवकरच भाजप सत्तेत येणार असल्याची विधानं भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नये म्हणूनच भाजप सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
भाजपचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री @nawabmalikncp यांनी केली आहे. pic.twitter.com/cTwFDyqJWB
— NCP (@NCPspeaks) June 2, 2021
नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या सत्तेत येण्याच्या विधानांचा समाचार घेतला.
भाजपचे नेते सत्तेत येणार असं वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्यानं ते हताश झाले आहेत.
त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.
रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’
मलिक पुढे म्हणाले, इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आमदार स्वगृही परतू नयेत, या भीतीमुळे राज्यात लवकरच सत्ता येणार असल्याचं भाजप सांगत आहे.
मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत.
कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशा अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीवर मात करुन जनतेला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
त्यामुळे जनता संतुष्ट आहे. पण सत्ता येणार असं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरु असल्याचे, नवाब मलिक यांनी सांगितले.
काय म्हणाले होते फडणवीस ?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते.
सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे.
राजकीय सत्तांतर वगैरेकडे आम्ही लक्ष देणार नाही.
एकदा कोरोनाचे संकट गेले की मग पाहू, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्तांतराची जोरदार चर्चा सुरु झाली.
–
टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या