यापुर्वी शरद पवारांवर केली टीका अन् आता मुलाखतीतून मार्गदर्शन घेतायेत : नारायण राणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कुठल्याही नेत्याविरोधात टीका झालेली नाही तेवढी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर दैनिक ‘सामना’मधून केली गेली. ज्या भाषेत केली गेली ती भाषा मी उच्चारु शकत नाही. कारण, पवारांबाबत माझ्या मनात आदर आहे, असे भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीबाबत राणे यांनी टीका केली आहे. अगोदर टीका केली आता मुलाखतीतून मार्गदर्शन घेत आहेत, असेही राणे म्हणाले आहेत.

यावेळी १९९५ मधल्या दैनिक ‘सामना’तील अंकात प्रदर्शित झालेले मथळे वाचून दाखवत राणे म्हणाले, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला मुख्यमंत्री आहे की नाही कळत नाही. सगळी अनागोंदी माजली असून अशात त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून ही मुलाखत घेतली आहे, अशी प्रतिक्रियाही भाजपचे नेते नारायण राणे यांनी दिली आहे.

राणे म्हणाले, अगोदर दैनिक ‘सामना’मधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विखारी लेखन केले आहे. आता मुलाखती घेऊन मार्गदर्शन घेतले. मुलाखत टीका करण्यासाठी होती, राज्यांच्या प्रश्नांबाबत नव्हती. राज्य कसे चालले आहे?, राज्याचे मुख्यमंत्र्यांना कारभार जमतोय का? हे असले प्रश्न विचारले गेले. दैनिक ‘सामना’मधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली जाते आहे, हेच राजकारण आहे. कारण, आत्तापर्यंत एकाही वृत्तपत्राने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर एवढी टीका केली नाही, जेवढी दैनिक ‘सामना’ने केली आहे, असेही भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले कि, खासदार संजय राऊत यांनी ज्या ऐटीत, ज्या रुबाबात मुलाखत घेतली त्याचा संदर्भ मी घेतो. त्या मुलाखतीच्या पहिल्याच भागात शरद पवार यांची भीमटोला मुलाखत, सत्तेचा दर्प चालत नाही लोक पराभव करतात, असे हेडिंग दिले आहे. सत्तेचा दर्प चालत नाही त्यासाठी नाव घेतले नाही. देवेंद्र फडणवीस हे घमेंडी नेते नाहीत, असेही राणे यांनी म्हटले आहे. सत्तेवर असतानाही त्यांनी कधी सत्तेची मस्ती दाखवली नाही. त्यांच्या पुन्हा येईन वक्तव्यात गर्व नाही. त्यातून कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केलाय.

मात्र, ही बाजू पवार यांना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी जे वाक्य वापरले ते योग्य नाही. १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचे योगदान काय? २०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार आणि आमदार निवडून आले ते कुणामुळे ते भाजपमुळेच. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली याचं आश्चर्य वाटते. शिवसेना जातीयवादी पक्ष आहे, भाजप जातीयवादी पक्ष आहे, ही टीका करणारे हेच लोक आहेत. जातीयवादी पक्षासोबत एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे की स्वतःच्या कल्याणाचे आहे? ते समाजवून सांगितले असते तर बरं झाले असते, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.